पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
चिमुकल्यांनी हिंदी-मराठी गाण्यांवर नृत्य करीत भारतीय संस्कृतीचे महत्त्व अगाध असल्याचे दाखवून दिले आहे. बालवयात चांगले संस्कार आणि दिशा देण्याचे काम शिक्षकांकडून केले जात आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शालेय जीवनातील संस्कार महत्त्वाचे आहेत. असे मत सहायक प्रशासकीय अधिकारी शिवाजी अढागळे यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिकेच्या गोपाळपट्टी येथील शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हडपसरमधील स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहामध्ये झाले. याप्रसंगी माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे, मुख्याध्यापिका संगीता जगताप, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका डॉ. नलिनी चौधरी, आशा विंभोरे, रमेश दळवी, उषा खाडे, प्रियांका खाडे, दीपक मोरे, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका डॉ. नलिनी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम दिली, त्याचा स्वीकार अडागळे यांनी केला. मुलांना चागंले शिक्षण ही आता काळाची गरज आहे, असे चौधरी यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे म्हणाले की, तुम्ही टीव्ही बघितला, तर मुले टीव्ही बघणार, मोबाईलवर पाहात बसला, तर मुले मोबाईल घेणार, आपण जे करतो, त्याचे अनुकरण मुले करतात. त्यामुळे मुलांसमोर भांडू नका, मोबाईल पाहात बसू नका, टीव्ही बघू नका, त्यांच्यासमोर पुस्तकं वाचा, ते पुस्तक वाचतील आणि अभ्यास करतील, असा सल्ला त्यांनी दिला.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























