Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याउन्हाळ्यात पाणी जपून वापरा

उन्हाळ्यात पाणी जपून वापरा

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

आता कुठे उन्हाळा सुरू झाला आहे. पण आतापासूनच सूर्य तीव्र आग ओकू लागला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी दिवसेंदिवस आटू लागले आहे. परिणामी धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पुणेकरांनो, आपल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या किती पाणी उरले आहे, बघा आणि आतापासूनच पाणी जपून वापरायला सुरुवात करा. अन्यथा आपल्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, हेही तेवढेच सत्य आहे. 

सध्या उन्हाळ्याचा पहिलाच महिना सुरू आहे. परंतु आतापासूनच उन्हाच्या वाढू लागल्या आहेत. त्यातच आताच जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागणार , हे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

सध्या, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून शहराला आगामी अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला आवश्‍यक असणाऱ्या पाणीसाठ्याच्या तुलनेत सुमारे अडीच टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा येत्या जून महिन्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या केवळ १५.५५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
खडकवासला प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी शहराला पिण्यासाठी सुमारे पाच टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा हा पाणीसाठा शहराला आणखी केवळ अडीच महिने म्हणजेच मे महिन्याच्या शेवटापर्यंत पुरेल इतकाच आहे. परिणामी ममहिन्याच्या अखेरीस शहराला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पाणी टंचाईचा सामना टाळण्यासाठी पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. या वृत्तास जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला सुमारे २१ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७५ टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत आहे.  दरम्यान, खडकवासला धरणातून दौंड नगरपालिका आणि ग्रामीण भागातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. याशिवाय रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी प्रत्येकी दोन आवर्तने सोडण्यात येत असतात.

खडकवासला प्रकल्पातील पाण्याची स्थिती  (टीएमसीमध्ये)

– या प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा — २९.१५ टीएमसी
– सध्या उपलब्ध असलेला साठा — १५.५५
– शहराला मंजूर पाणी कोटा (वार्षिक) — १४.६१  टीएमसी
– प्रत्यक्षात वापरले जाणारे पाणी (वार्षिक) — सुमारे २१ टीएमसी

जलसंपदा विभागाने केलेले पाणी वाटप नियोजन (वार्षिक)

– पुणे शहराला पिण्यासाठी पाणी — १४.६१ टीएमसी
– बाष्पीभवन व वहनव्ययाने कमी होणारे पाणी — २.९० टीएमसी
– दौंड शहर व ग्रामीण भागासाठी लागणारे पाणी — ०.९६ टीएमसी
– सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी — १०.५४ टीएमसी

खडकवासला प्रकल्पांतील धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात गतवर्षीच्या पाणीसाठा)

– टेमघर — ०.४४ टीएमसी (०.३७)
– वरसगाव — ७.५९ (७.५०)
– पानशेत — ६.१३ (५.९२)
– खडकवासला — १.३९  टीएमसी (१.०३)
– एकूण — १५.५५ टीएमसी (१४.८२)   

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये
उरले ९५.८६ टीएमसी पाणी

दरम्यान , पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता.१५ ) फक्त ९५.८६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ४८.३३ टक्के इतके  आहे. हा उपलब्ध पाणीसाठा गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत ३४.६१ टक्के होता. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील  उजनीतील उपयुक्त पाणीसाठा २४.०२ टीएमसी इतका शिल्लक राहिला आहे. 

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ६८.६६ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत.

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील आजचा उपलब्ध पाणीसाठा टीएमसीमध्ये कंसात गतवर्षीचा आजचा पाणीसाठा)

– पवना — ४.५० (४.४३)
– चासकमान — ३.३९ (३.०४)
– भामा आसखेड — ४.२६ (४.२६)
– भाटघर — १४.६२ (११.१९)
– नीरा देवघर — ५.४२(४.५०)
– वीर — ४.३९ (४.४६)
– माणिकडोह — १.४४(२.७०)
– डिंभे — ५.८७(६.३७)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...
error: Content is protected !!