पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे देशाप्रती योगदान फार महत्त्वाचे आहे. नेताजींच्या सार्वजनिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेमाची शिकवण घेतली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी व्यक्त केले.
कोंढवा-येवलेवडाी येथील के.जे. शिक्षण संस्थेतील ट्रीनिटी पॉलीटेक्निकमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. अनुविद्युत आणि दूरसंचार विभागाच्या प्रा. वंदना डाके व प्रा. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी कॉलेजचे सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.
प्रा. युवराज पवार म्हणाले की, डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल, आणि अंतकरणात स्वातंत्र्याचे वादळ, हाच खरा क्रांतिकारकाचा वाणा हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे घोषवाक्य आहे. त्यागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सदाफ तांबोळी, सलीना खान, मिताली ननावरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षकांकरिता खजिना शोध स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रथम वर्ष तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांनी सूक्ष्म प्रकल्प प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच पोस्टर सादरीकरण देखील करण्यात आले.
संस्थापक कल्याणराव जाधव व संकुल संचालक समीर कल्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. कोमल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ऋतुजा काडगी यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























