Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याबाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच : रामदास आठवले

बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच : रामदास आठवले


–  महायुतीने महापालिका निवडणूका एकत्रित लढवाव्यात
–  रायगड, नाशिक पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील
–  वाल्मिक कराडवर खूनाचा गुन्हा दाखल करावा   

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

  विधानसभा निवडणूकीत जनतेने महायुतीला भरभरून यश दिले.  शिवसेनेचे ५७ आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडून आणले. त्यामुळे मातोश्री वर आता खरी शिवसेना राहिलेली नाही. तर खरी शिवसेना आता ठाण्याच्या बाजूने असून, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत.असे स्पष्ट मत केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली.या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना स्वतःचे आमदार देखील सांभाळता आले नाहीत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. परंतू मतदारांनी विरोधकांना डावलले. खोटे बोलून आरोप करून निवडणूका जिंकता येत नाहीत. केवळ टिका कऱणे आणि आरोप करणे हे जनतेला पसंत पडले नाही. लाडकी बहिण योजनेचाही महायुतीला फायदा झाला. आमचा पक्ष भाजपचा पहिल्यापासून मित्र पक्ष राहिला आहे. त्यामुळे दलित समाजाने देखील महायुतीला मतदान केले.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आठवले म्हणाले की, महायुतीत कोणताच वाद नाही. मात्र पालकमंत्री पद आपल्या नेत्याला मिळावे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासंबंधीचा निर्णय घेतील. येणार्या महापालिका निवडणूकांसाठी पुणे शहरात आरपीआय ला १५ ते १६ जागा मिळाव्यात अशी आमची महायुतीकडे मागणी आहे. तसेच महायुतीने एकत्रित महापालिकेच्या निवडणूका लढवाव्यात. महापौर पद जर अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव झाल्यास, महापौर पद आरपीआयला मिळावे,अशी आमची मागणी आहे.
बीड आणि परभणी प्रकरणाबाबत रामदास आठवले म्हणाले की, दिवंगत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना न्याय मिळाला पाहिजे. देशमुखांच्या हत्येच्या अगोदर कराड आणि त्याच्या साथीदारांचे संभाषण झाले होते. त्यामुळे बीड प्रकऱणात वाल्मिक कराड वर खूनाचा गुन्हा दाखल करावा. परभणीतील घटनेबाबत पोलिसच जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित पोलिसांना बडतर्फ करावे.
  भीमा कोरेगाव येथील स्मारकाबाबत रामदास आठवले म्हणाले की, स्मारकाच्या विकासाचे प्रकरण गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. स्मारकाच्या विकासाच्या आराखडयासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. स्मारकाचा विकास वेगाने व्हावा. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिणार आहे. 


डॉ.सिद्धार्थ धेंडे स्वतःहून आले तर पक्षात पुन्हा घेण्यात येईल.
महायुतीच्या विरोधात डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी अशी भूमिका घ्यायला नको होती. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले. जर डॉ.सिद्धार्थ धेंडे स्वतःहून आले तर त्यांना पक्षात पुन्हा घेण्यात येईल. असेही केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...
error: Content is protected !!