HomeSRAसोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.

 

पुणे : ऑल शीख शिकलीकर असोसिएशन ‘आशा’चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच पीएमसी व पीडब्ल्यूडीचे कंत्राटदार उद्योगपती बच्चनसिंग ईश्वरसिंग कल्याणी यांनी त्यांच्या कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना कल्याणी म्हणाले की, ते गेली २५ वर्षे उद्योग-व्यवसाय करत असून रामटेकडी, हडपसर तसेच महाराष्ट्रात शीख शिकलीकर व सर्वधर्मीय समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. असे असताना त्यांच्या नात्यातील मलखेसिंग दुधाणी व त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर रील टाकून कल्याणी कुटुंबाची नाहक बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला. रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला. तसेच यापूर्वी दुधाणी कुटुंबाने आपली वाहने जाळून नुकसान केल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बच्चनसिंग कल्याणी, बॉबीसिंग बच्चनसिंग कल्याणी आणि शिस्तोलसिंग ईश्वरसिंग कल्याणी यांनी केली. यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात.. काँग्रेस पक्ष मैदानात!

राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध   पुणे : देशातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी व हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सनदशीर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना...

धर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या 'वाणी' समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची...

येरवडा कारागृहात अभंग वारी ‘ कार्यक्रम; ५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असते - कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात.. काँग्रेस पक्ष मैदानात!

राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध   पुणे : देशातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी व हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सनदशीर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना...

धर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या 'वाणी' समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची...

येरवडा कारागृहात अभंग वारी ‘ कार्यक्रम; ५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असते - कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक...
error: Content is protected !!