कोणताही अन्याय होऊ नये व सर्वांना समान न्याय मिळावा :- क्रांतिवीर सेना
पुणे:- दि. 14 जुलै रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील सर्व मंडळे व संघटनांना कोणताही अन्याय होऊ नये, सर्वांना समान न्याय मिळावा आणि जयंती उत्सव शांततेत व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्याकरिता क्रांतिवीर सेनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:-
- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक विभागाचे (DCP Traffic), परिमंडळ १ ते ६ चे सर्व पोलीस उपायुक्त (DCP) तसेच पुणे शहरातील सर्व जयंती मंडळे व संघटनांची संयुक्त नियोजन बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी.
- जयंती मिरवणुकांसाठी ध्वनीक्षेपक (स्पीकर) वापरण्यास रात्री १२.०० वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी.
- पुणे शहरातील सर्व नव्याने स्थापन झालेल्या व पात्र मंडळांना कोणताही भेदभाव न करता कायदेशीर परवानगी देण्यात यावी.
- दरवर्षीप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या पारंपरिक मिरवणूक मार्गांवर (Route)च परवानगी देण्यात यावी, जेणेकरून कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही.
क्रांतिवीर सेनेची स्पष्ट भूमिका :
डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाला कोणत्याही मंडळावर अन्याय होऊ देणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व मंडळांना समान न्याय, समान संधी आणि सन्मान मिळावा, यासाठी क्रांतिवीर सेना शेवटपर्यंत संघर्ष करेल.
यावेळी क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष मनोज आप्पा क्षीरसागर, चांगदेव नेटके, तेजस साबळे, शाकीर खान, भोला माने, विनायक साबळे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























