HomeMumbaiधर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

धर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या ‘वाणी’ समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची मूळ जात बदलत नाही.

 

पुणे- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, केवळ धर्मपरिवर्तन किंवा धार्मिक आचरण बदलल्यामुळे व्यक्तीची जन्मजात जात बदलत नाही. हा निर्णय भविष्यातील जातवैधता प्रमाणपत्राशी संबंधित प्रकरणांसाठी मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण अमरावती येथील २० वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनी प्राची सुधीर नेटके यांच्या याचिकेशी संबंधित आहे. त्यांनी ‘वाणी’ या इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, शाळा सोडल्याच्या दाखल्यात जात ‘सैतवाल जैन’ अशी नोंद असल्याचे कारण देत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तसेच ‘जैन वाणी’ हा समाज राज्याच्या OBC यादीत नसल्याचाही मुद्दा समितीने मांडला होता.

या निर्णयाविरोधात प्राची नेटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी करत समितीचा आदेश रद्द केला.

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या ‘वाणी’ समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची मूळ जात बदलत नाही. धर्म आणि जात या स्वतंत्र संकल्पना असून धार्मिक श्रद्धा किंवा आचरण बदलल्याने जन्मजात सामाजिक ओळख बदलत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्व पुरावे आणि नोंदींचा विचार करून न्यायालयाने संबंधित जात पडताळणी समितीला प्राची नेटके यांना ‘वाणी’ समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र चार आठवड्यांच्या आत जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात.. काँग्रेस पक्ष मैदानात!

राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध   पुणे : देशातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी व हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सनदशीर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना...

येरवडा कारागृहात अभंग वारी ‘ कार्यक्रम; ५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असते - कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात.. काँग्रेस पक्ष मैदानात!

राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध   पुणे : देशातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी व हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सनदशीर, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना...

येरवडा कारागृहात अभंग वारी ‘ कार्यक्रम; ५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असते - कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक...
error: Content is protected !!