– महावितरणच्या गैरकारभाराला नागरिक वैतागले
– आंदोलन करण्याच्या तयारीत
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
केशवनगर (मुंढवा) परिसरात ऐन उन्हाळ्च्या दिवसात गेल्या चार दिवसांपासून रात्री उशीरा वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. या खंडित होणा-या वीज पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. अगोदरच उकाडा त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी आता महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
सध्या कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण होत आहेत.त्यातच गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानत वाढ झाली आहे. त्यामुळे कितीही पंखे अगर वातानुकुलित यंत्रणा लावल्या तरी उकाडा कमी नसल्याचे दिसून आले. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांपासून रात्री दोन वाजल्यापासून पहाटी पाच वाजेपर्यत रोजच वीज पुरवठा खंडित होत आहे. परिणामी नागरिकांची चांगलीच झोप मोड आहे.बहुतांश नागरिकांना सकाळी कामावर जायचे असते. मात्र या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर कामावर जाता येत नाही. याबाबत बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच हडपसर उपविभागाचे अतिरिक्त अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना वारंवार नागरिक फोन करून तक्रारी करीत आहेत.मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे ते फोन उचलत नाहीत. अशा तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत. या भागातील खंडित वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करा, अन्यथा आंदोलन करून असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
————————–
कोट
केशवनगर भागात गेल्या चार दिवसांपासून रात्रीचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत् आहे.त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. महावितरण वीज कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन दुरूस्ती करावी
– सोमनाथ गायकवाड्- सामाजिक कार्यकर्ते-केशवनगर
——————————-
कोट
महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे वारंवार वीज पुरवठा रात्रीच्या वेळी खंडित होत आहे.त्यामुळे लक्ष दिले नाही तर महावितरणच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.
-संजय कदम -स्थानिक ग्रामस्थ -केशवनगर
——————————-

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























