Homeआरोग्यजी बी एस हा आजार नक्की काय आहे: डॉ.प्रमोद लोहार

जी बी एस हा आजार नक्की काय आहे: डॉ.प्रमोद लोहार

पुणे : (पुणे 24 तास ब्युरो )


Guillain-Barre Syndrome (GBS)

या आजाराचा किंवा Syndrome चा शोध *French neurologists Georges Guillain आणि Jean Alexandre Barré यांनी १९१६ साली लावला म्हणून त्यांच्या नावामुळे या Syndrome चे नाव *Guillain-Barre Syndrome* असे पडले.

या आजारामध्ये माणसाची स्वतःची प्रतिकारशक्ती स्वतःच्या नर्व्हस सिस्टीम वर हल्ला चढवते. आणि शरीरातील नसा आणि स्नायू यांचे कार्य त्यामुळे बाधित होते. म्हणजेच हा एक प्रकारे ऑटो इम्युन स्वरूपाचा आजार आहे. हा आजार अचानक एखाद्याला का होतो याचे अजून ठाम स्वरूपाचे उत्तर सापडलेले नाही. पण असे लक्षात आले आहे की बरेचदा एखादे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर काही वेळेला लसीकरणानंतर किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झालेली असते अशा वेळेला हा आजार उद्भवतो. अशा वेळेला शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती (Immune System) हायपर रिऍक्ट होते.
कधी कधी काही रुग्णांमध्ये याचे निदान पटकन होत नाही. एखादा रुग्ण पायामध्ये अशक्तपणा वाटत आहे किंवा संवेदना कमी झालेल्या आहेत म्हणून डॉक्टरांकडे येतो. अशा वेळेला त्या रुग्णांमध्ये हा आजार असेल याचा पटकन अंदाज कधी कधी येत नाही आणि बाकी अन्य कारणांचा विचार केला जातो. पण कालांतराने पायामधील संवेदना कमी होणे तसेच ताकद कमी होणे, उभे राहण्यासाठी-चालण्यासाठी पायात जीव न राहणे अशी लक्षणे पुढे दिसायला लागल्यानंतर या आजाराचा संशय येतो.
हे रुग्ण सुरुवातीला कमी न होणारा ताप , ज्याचे नक्की निदान होत नाही असे लक्षण घेऊन येतात आणि नंतर या रुग्णांमध्ये मज्जा संस्था (नर्व्हस सिस्टिम रिलेटेड विकनेस) आणि इतर लक्षणे दिसायला लागतात. काही रुग्णांमध्ये श्वसनाचे स्नायू पण दुर्बल व्हायला लागतात आणि रुग्णाला स्वतःहून श्वास घेता येत नाही आणि मग त्याला श्वसनासाठी व्हेंटिलेटरची गरज भासू लागते.

GBS हा दुर्मिळ परंतु बरा होणारा आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, नसा (nerves)कमजोर करते. यामुळे हातपाय, मान, डोळे आणि चेहरा यावर परिणाम होतो. शरीरामध्ये बधीरता येते. गंभीर प्रकरणांमध्ये चालता येत नाही, श्वास घेता किंवा गिळता येत नाही. हा आजार अचानक सुरू होतो आणि चार आठवड्यांत वाढतो. काही जणांमध्ये आजार लवकर बळावतो, तर काहींमध्ये हळूहळू वाढतो. गंभीर प्रकरणांमध्ये ICU व व्हेंटिलेटरची गरज भासते. उपचारांसाठी IVIg इंजेक्शन किंवा प्लाझ्मा एक्सचेंज केला जातो.

कॅम्पिलोबॅक्टर GBS

दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यामुळे कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्ग होतो. यामुळे जुलाब आणि पोटदुखी होऊ शकते. काही जणांमध्ये या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर संसर्गदेखील याला कारणीभूत ठरू शकतात.

कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्गाची लक्षणे

▫️ जुलाब (रक्तसह होऊ शकतो)
▫️ पोटदुखी
▫️ ताप
▫️ मळमळ किंवा उलट्या

काळजी

▫️ नेहमी पाणी उकळून प्या
▫️ सकस व ताजे अन्न घ्या
▫️ भाज्या व फळे स्वछ धुऊन घ्या
▫️ चिकन, मासे चांगले शिजवुन घ्या (७५°C तापमानाला)
▫️ अर्धवट शिजलेले अन्न व कच्चे अंडे खाणे टाळा
▫️ स्वच्छता पाळा-जेवणापूर्वी आणि टॉयलेटनंतर हात साबणाने स्वछ धुवा
▫️ दुसऱ्यांसोबत भांडी वा अन्न वाटून खाणे टाळा
▫️ किचन स्वच्छ ठेवा
▫️ कच्चे व शिजलेले अन्न वेग-वेगळे ठेवा
▫️ स्वयंपाकघर व भांडी स्वच्छ ठेवा

हा आजार सामान्यतः दुर्मिळ आहे पण मागच्या काही आठवड्यांत सिंहगड रोड भागात याची प्रकरणे वाढली आहेत.

सुरुवातीला जाणवणारी लक्षणे

▫️ अतिसार किंवा खोकला येणे
▫️ पाय किंवा हातात अचानक अशक्तपणा जाणवणे
▫️ चालता न येणे किंवा शरीर बधीर होणे
▫️ रक्तासह अतिसार होणे

अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...
error: Content is protected !!