पुणे २४ तासः- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धैर्य, शिस्त आणि राष्ट्रभक्ती प्रचंड होती. त्यांच्या जीवनातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण व देशसेवेची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी व्यक्त केले.
येवलेवाडी-कोंढवा येथील ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’, ‘नेताजी अमर रहे’ असे देशभक्तीपर घोषणा देत राष्ट्रप्रेमाची ज्वाला पेटवली. तसेच, विद्यार्थ्यांनी मनोगत, चित्रिकरण आणि देशभक्तीपर गाण्याद्वारे नेताजींना अभिवादन केले.
प्रा. भैरवनाथ जाधव यांनी क्रांतिकारी विचारांचा उल्लेख करत आजच्या पिढीने सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. सारिका कोरडे यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























